आंबेगावच्या पश्र्चिम भागात भाताच्या पिकाचे नुकसान

आंबेगावच्या पश्र्चिम भागात भाताच्या पिकाचे नुकसान

Published on

घोडेगाव, ता २९ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात मागील दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकासह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात केली आहे.
भात काढणीस आलेला असताना भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे, भाताचे पीक हे प्रमुख पीक असून या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी हिताचे विविध निर्णय तातडीने घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
याबरोबरच, नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देखील किसान सभेने पाठिंबा दर्शवला असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी ही मागणी या निवेदनातून केली गेली आहे. यावेळी नायब तहसीलदार शांता मधुकर असवले (बांगर) यांनी किसान सभेचे हे निवेदन स्वीकारले.
यावेळी किसान सभेचे राजू घोडे, नवनाथ कोरके, विजय पोंदे, एस. एफ.आय.चे समीर गारे, रोहिदास फलके, सतीश लोहकरे आणि जनवादी महिला संघटनेच्या सुशीला गभाले, संचिता अलका उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com