नारोडी परिसरात वानरांकडून शेतीचे नुकसान
घोडेगाव, ता. ८ ः नारोडी (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याची भीती कायम असतानाच अलीकडे वानरांच्या टोळीने शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा संकटात सापडला असून, या वनखात्याने वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून ५० ते ६० वानरांची संख्या असलेली एक टोळी नारोडी, चास, कडेवाडी, चिंचोडी या गावांच्या परिसरात वास्तव्यास आहे. मका, उन्हाळी भुईमूग, कांदा रोपे व लागवड केलेले कांदे, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटे, शेवगा, घेवडा अशा विविध नगदी पिकांचे वानरांची टोळी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे जगणे ही मुश्कील झाले आहे. लवकरात लवकर वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा लागवड केलेले कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर नाईक व शरद घोडेकर म्हणाले, ‘‘नारोडी परिसरातील चार गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. आता सहा महिन्यांपासून वानरांची मोठी टोळी येथे दाखल झाली आहे. अनेक नगदी पिकांचे वानरांनी नुकसान केले आहे. वन खात्याने तातडीने या वानरांना जेरबंद करून अन्यत्र हलवावे, अन्यथा नारोडी ग्रामस्थ आंदोलन करतील. येथे चार ते पाच बिबट्यांचा वावर आहे. आजपर्यंत एकही बिबट्या येथे जेरबंद झालेला नाही.’’
04636
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

