‘उजनी’ने ओलांडली साठ्याची शंभरी
इंदापूर, ता. १८ : पुणे, सोलापूर आणि अहिल्या नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाने पाणीसाठ्याची शंभरी पार केली असून, धरणात १०४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पातळी राखण्यासाठी गाळ मोऱ्यांमधून १६०० क्यूसेकने विसर्ग सुरू करीत वीज निर्मिती केंद्र कार्यान्वित केले आहे. तसेच, पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाने दिली. तसेच, नदीपात्रातील तसेच लगतच्या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणीपातळी सातत्याने वाढली. गेल्या काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत होती. सोमवारी (ता. १८) सायंकाळी नोंद झालेल्या ११९.६८ टीएमसी पाणीसाठ्यामुळे धरण प्रत्यक्षात १०४.५७ टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. खरीप पिकांच्या वाढीसाठी आणि रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निश्चित झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा पाण्यावरील ताण कमी होणार आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने धरण पाणी पातळी राखण्यासाठी सोमवारी (ता. १८) विद्युत निर्मितीसाठी १६०० क्यूसेकने धरणाच्या गाळमोऱ्यांमधून विसर्ग सुरू केला. तसेच, या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.