जेजुरीत सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या
जेजुरी, ता. १४ : जेजुरी शहरातील विद्यानगर येथील राजवीर शेखर पाले (वय १६) या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंबिका शेखर पाले व त्यांचे पती शेखर आणि मुलगा राजवीर हे जेजुरी शहरातील विद्यानगर परिसरातील मध्यवर्ती भागात राहत होते. बुधवारी सायंकाळी राजवीर याने दरवाजाला आतून कडी लावून घरातील अॅंगलला ओढणी बांधून गळफास घेतला. घरातील व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी दरवाजा तोडून त्याला सोडवून तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अंबिका यांचे मावस भाऊ अक्षय पंढरीनाथ मोरे (रा. जेजुरी) यांनी फिर्याद दिली. आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पुजारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.