खळद परिसरात शेतकऱ्यांकडून समाधान
खळद, ता.१३ : खळद (ता.पुरंदर) येथे बुधवारी (ता. १३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात होईल, असे प्रगतशील शेतकरी विलास कामथे यांनी सांगितले.
गेले आठ दिवसांत येथे वातावरण बदल झाला असून, या काळात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे तर तीन दिवस थोड्याफार प्रमाणात पाऊसही झाला आहे. यामुळे सध्या शेतात असणाऱ्या चारा पिकांचे त्याचप्रमाणे आंबा, डाळिंब यासारख्या फळबागांचे थोड्या फार नुकसान होत आहे.
सध्या खळद परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. अशावेळी पावसाला लवकर झालेली सुरुवात पाहता यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सध्या झालेला पाऊस हा योग्य वेळी झाला आहे. पिकांसाठी हा पाऊस लाभदायक आहे. चैत्र महिन्यात झालेला पाऊस हा खरिपाच्या पेरणीसाठी अडचणीचा ठरतो. वैशाखमध्ये झालेला पाऊस हा खरिपासह संपूर्ण वर्षभरातील पीक पाण्यासाठी लाभदायक असतो. यामुळे सध्याचा होणारा पाऊस पाहता येणाऱ्या वर्षात शेतीसाठी अनुकूल राहील.
- चंद्रकांत कामथे, प्रगतशील शेतकरी, खळद.
03040
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.