आजार टाळण्यासाठी भरडधान्य खा
कडूस, ता.२१ : ''गहू आणि तांदळाच्या तुलनेने भरडधान्यात जीवनसत्वे, खनिजे प्रचंड प्रमाणात असतात. भडरधान्य खाल्ल्यावर रक्तात हळूहळू साखर सोडली जाते, उलट गहू, तांदूळ खाल्ल्याने रक्तात साखरेचा पूर आल्यासारखे होते. यामुळे चित्रविचित्र विकार होतात. हे आजार टाळायचे असतील तर भरडधान्य खा,'' असे आवाहन ''आत्मा''चे खेड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी केले.
रानमळा (ता.खेड) येथे भरडधान्य-तृणधान्य व मानवी आरोग्याच्या जनजागृतीसाठी बाजरीपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे कृषी विभागाच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने मकर संक्रांतीचा भोगीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये वैयक्तिक महिलांसह महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात महिलांनी बाजरीपासून थालीपीठ, घावणे, खिचडी, घुगरी, कापण्या, पिठवणी, कोटकं, गोड चिवड्याचे खाद्य प्रकार तयार केले होते.
यावेळी सरपंच प्रमोद शिंदे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यादवराव शिंदे, कृषी अधिकारी अश्विनी नंदकर, कृषी सहायक मोहिनी अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा दौंडकर, उल्हास भुजबळ, अलका शिंदे, वर्षा शिंदे, विजय दौंडकर, नीलेश शिंदे, मच्छिंद्र मोरे, रामदास शिंदे, गणेश भुजबळ व महिला बचत गट उपस्थित होते.
00953
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.