पाटस येथे पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

पाटस येथे पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

Published on

कानगाव, ता. ८ : पाटस (ता. दौंड) परिसरात सोमवारी (ता. ८) दुपारी तीन वाजल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यावेळी आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची व व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विक्रीसाठी आणलेला भाजीपाला भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भाजीपाला विक्रीविना तसाच पडून राहिला. काही भाजीपाला फेकून द्यावा लागला.
पाटस परिसरात सकाळपासून उकाडा जाणवत होता. तसेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे व्यापारी वर्गाने ताडपत्री व छत्र्या आणल्या होत्या. दुपारी तीन वाजल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पाटस कानगाव रस्त्यालगत बाजार भरत असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा लोट बाजारात शिरला. त्यामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची व व्यापाऱ्यांची धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. खराब झालेला भाजीपाला फेकून देण्याची नामुष्की शेतकरी व व्यापाऱ्यांवर ओढवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.