कचरवाडीत नागरिकांकडून टँकरची मागणी

कचरवाडीत नागरिकांकडून टँकरची मागणी

निमगाव केतकी, ता. १० : निमगाव केतकी नजीक कचरवाडी गावामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शासनाने येथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ मागील एक महिन्यांपासून करत आहेत.
याबाबत मारुती कचरे म्हणाले, ‘‘गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसातून एकदा फक्त दहा मिनीट पाणी पुरवठा होतो. त्यामुळे माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सध्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.’’
माजी सरपंच नंदा लहू कचरे म्हणाल्या, ‘‘गावात व वाड्यावस्त्यांवर पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करून पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल थांबवावेत.’’ याबाबत सरपंच रामदास कचरे यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने पंचायत समितीला टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिलेला आहे. याची दखल घेऊन टँकर सुरू करतील.


कचरवाडी (ता. इंदापूर) : गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com