चिखलगावात रानडुकरांकडून भात शेतीचे नुकसान
कोळवण, ता. ३ ः चिखलगाव (ता. मुळशी) येथे रानडुकरांनी भात शेतात उच्छाद मांडला आहे. गावात डोंगराच्या पायथ्याशी व गावाच्यावर असणाऱ्या भात शेतीचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रात्रीच्या वेळी रानडुक्कर भात शेतात येऊन सर्व शेतीत तुडवतात. यामुळे भाताच्या लोंब्यांमधील दाणे जमिनीवर पडत आहेत व पेंढा वाया जात आहे. त्यामुळे काढणीस आलेले भात पीक वाया जात आहे. वनविभागाच्या वतीने पिकाची पाहणी करण्यात यावी व याबाबत कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी मारुती फाले, वाघु फाले, दत्ता सातपुते, नारायण फाले यांनी केली आहे.
02636
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

