''चासकमान''च्या पाण्याचे शिरुरकरांकडून स्वागत

''चासकमान''च्या पाण्याचे शिरुरकरांकडून स्वागत

Published on

शिक्रापूर, ता.२६ : करंदी (ता.शिरूर) येथे आज (ता.२६) संध्याकाळी सहा वाजता चासकमान धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे स्वागत शिरुरकरांनी केले. यावेळी त्यांनी ''बम भोले'', ''जय श्रीराम'', ''गंगा माता की जय'' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
कित्येक दिवसांपासून असलेली पाण्याची प्रतीक्षा संपली. यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पलांडे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब चव्हाण, सुरेश थोरात व भगवानराव शेळके यांच्या हस्ते पाण्याची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने शिरुरकरांसाठी चासकमानला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि तमाम शेतकरी यांच्यासाठी आजचा दिवस सोन्याचा असल्याचे भाजपच्या आंबेगाव-शिरूर मतदारसंघ प्रमुख जयश्री पलांडे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे माऊली साकोरे, बापू मासळकर, समाधान डोके, रवी गायकवाड, नितीन कदम, वसंत खलाटे, राजेंद्र पलांडे, बाळासाहेब खेडकर, अनिल खेडकर, आदींसह प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळाने हैराण शिरूर तालुक्यासाठी पाणी मिळावे म्हणून आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे. हा काही श्रेयवादाचा विषय नाही. मात्र, पाणी मागणीपासून ते प्रत्यक्षात येणे हे स्वप्नवत वाटत होते. आता चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्या गतीने पाणी संकलित होत आहे. त्याप्रमाणात विसर्ग कमी असल्याने येत्या पावसाळाभर किंवा शिरूरमध्ये पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी चालू राहील, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
- अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली


02974

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.