शिरूरमधील १२ गावांच्या पाणीप्रश्नाचे आराखडे तयार

शिरूरमधील १२ गावांच्या पाणीप्रश्नाचे आराखडे तयार

Published on

शिक्रापूर, ता. ५ : शिरूरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत तीन प्रकारचे योजना आराखडे तयार करण्यात आले असून सर्वेक्षण अहवालही सरकारपर्यंत आलेले आहेत. पर्यायाने शिरूरच्या १२ गावांच्या पाणीप्रश्नाबाबत सरकार तत्काळ पावले उचलत असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
शिरूरच्या १२ गावांच्या पाणीप्रश्नी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागात येत स्वत: लक्ष घालून कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी या प्रश्नी ऑनलाइन बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी आमदार राहुल कुल, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जयश्री पलांडे, शेखर पाचुंदकर, मारुती शेळके, भरत साकोरे, दत्तूदादा भगत, दीपक खैरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, या योजनेसाठी येत्या अधिवेशन काळात ठोस आर्थिक तरतूद करण्याबाबतही सरकारस्तरावर विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com