इंदापूर, बारामतीतील शेतकऱ्यांना दिलासा

इंदापूर, बारामतीतील शेतकऱ्यांना दिलासा

Published on

काटेवाडी, ता. ९ : नीरा नदीच्या खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आणि नाझरे धरणांमधील समाधानकारक पाणीसाठ्याने इंदापूर-बारामती परिसरातील शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या एका महिन्याच्या पावसाळ्यात धरणांमध्ये एकूण ३४.८८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

पुढील अडीच ते तीन महिन्यांत ही धरणे १०० टक्के भरतील, अशी आशा आहे. यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऊस, केळी, डाळिंब-पेरूसारख्या फळबागा आणि ज्वारी-मक्यासारख्या खरीप पिकांना याचा थेट फायदा होईल. जलसंपदा विभागाच्या बुधवार (ता.९) च्या अहवालानुसार, नाझरे धरण पूर्णपणे भरले आहे.
दरम्यान, एक जूनपासून गुंजवणीला १२४४ (मिमी), निरी देवधरला ९६६ (मिमी), भाटघरला ४३३ (मिमी), वीर (मिमी) आणि नाझरेला १०५ (मिमी) पाऊस झाला. वीर धरणातून ११,४७६ क्यूसेक पाणी कालव्यांद्वारे सोडले गेले. तर गुंजवणीमधून २,६१४ आणि नाझरेमधून ३९४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासारख्या कार्यक्षम पद्धती वापरण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पाण्याचा काटकसरीने वापर होईल.

धरणांतील पाणीसाठा (९ जुलैपर्यंत )
धरणाचे नाव...........टीएमसी...............टक्केवारी
गुंजवणी.............२.५७.................६९.५६
नीरा देवधर..............६.५३.............५५.६७
भाटघर..............१७.३९...............७३.९९
वीर................७.८०.................८२.८८
नाझरे............०.५९..................१००.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com