तरकारी मालाची आवक जळोची बाजारात स्थिर

तरकारी मालाची आवक जळोची बाजारात स्थिर

Published on

काटेवाडी, ता. २७ : बारामती तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारासह सुपे आणि जळोची येथील उपबाजारांमध्ये भुसार आणि तरकारी मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहेत. बारामती तालुक्यात गहू (लोकवन) ची आवक ३७७ क्विंटल एवढी वाढली आहे, तर हरभरा (गरडा) ची आवक ७७ क्विंटल नोंदवली गेली असून, त्याला प्रतवारीनुसार सरासरी ५,९८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जळोची उपबाजारात पालेभाज्यांची आवक आणि बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले आहे. तसेच जळूची येथील उपवासामध्ये पालेभाज्यांची व तरकारी मालाची देखील आवक गुरुवारी (ता. २४) मोठ्या प्रमाणात झाली होती. प्रमुख शेतमालाची झालेली आवक व सरासरी दर क्विंटल मध्ये. हिरवी मिरची: ६०००, वांगी : १८००, शेवगा शेंग : २५००, भेंडी: २२००, गवार: ९०००, कारले : २५००, पुणेरी गवार : ४५००, आले : २५००, गोल्डन वाटाणा : ६०००, पावटा: ४०००, राजमा: ४०००, घेवडा : ४०००, लसूण : ६०००, बटाटा : १८००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com