तेलबियांचे उत्पादन वाढवून मिळणार शाश्वत उत्पन्न
काटेवाडी, ता. ७ : शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजना सुरू केली आहे. योजनेमुळे भुईमूग, कारळे, सूर्यफूल आदी तेलबियांचे उत्पादन वाढवून केंद्र सरकारतर्फे शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे उत्पादन केंद्रे आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमध्ये मूल्य साखळी समूह पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होणार असून, शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, नवीन तंत्रज्ञान आणि विपणन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही योजना जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिक लाभ मिळेल. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून खाद्यतेल उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी तेलबिया पिके: भुईमूग, कारळे, सूर्यफूल
अभियानाचा उद्देश
१. उत्पादन तफावत कमी करणे: तेलबिया पिकांमधील ६० टक्के उत्पादन तफावत कमी करणे.
२. आत्मनिर्भरता: खाद्यतेल उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवणे.
३. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे: सुधारित तंत्रज्ञान आणि विपणन सुविधांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
योजनेची पिकांचा समावेश
सोयाबीन, भुईमूग, मोहरी, करडई, सूर्यफूल, तीळ, कारळे,
कापूस बियाणे, तांदूळ-कोंडा आणि वृक्षजन्य तेलबिया
अंमलबजावणी पद्धत: मूल्य साखळी समूह आणि मूल्य साखळी भागीदार यांच्या माध्यमातून योजना राबवली जाईल.
योजनेचे स्वरूप:
तंत्रज्ञानाचा वापर: नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित बियाणे वापरून उत्पादन वाढवणे.
विपणन जोडणी: शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेशी जोडणे.
प्रशिक्षण आणि सुविधा: शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, माती परिक्षण आणि काढणीपश्चात सुविधांचा समावेश.
नोंदणी: शेतकऱ्यांनी कृषी मॅपर आणि ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य.
लाभार्थी निवड: प्रमाण: सर्वसाधारण ७४.८० टक्के, अनुसूचित जाती १६.६० टक्के, अनुसूचित जमाती ८.६० टक्के.
प्राधान्य: महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य.
पात्रता: शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा आणि प्रशिक्षणाची तयारी असावी.
अर्ज प्रक्रिया: इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/ वर अर्ज करावा.
मूल्य साखळी भागीदारीसाठी आवश्यक घटक
* कंपनी किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी, मार्च २०२२ पूर्वीची.
* किमान ३ वर्षांचा अनुभव आणि २०० शेतकऱ्यांचा समावेश.
* वार्षिक उलाढाल ९ लाखांपेक्षा जास्त आणि शेतकऱ्यांचा ३ लाखांचा समभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.