शेतकऱ्यांना मिळणार कृषी सेवा केंद्रासाठी लाभ
काटेवाडी, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावरील कृषी सेवा सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी वैयक्तिक लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाचा वापर करणे सोयीचे होईल आणि शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
कृषी आयुक्तालय, पुणे यांनी गुरुवारी (ता. ७) जारी केलेल्या पत्रानुसार, केंद्र शासनाच्या ५ मे २०२५ च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कृषी आयुक्तालयाच्या ५ जून २०२५ च्या सूचनांनुसार, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (विस्तृत प्रकल्प अहवाल आधारित) या योजनांद्वारे ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे आणि शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे.
या योजनेंतर्गत ग्रामीण उद्योजक, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, पंचायत प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांसह आता वैयक्तिक शेतकरीही भाडेतत्त्वावरील कृषी सेवा सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र ठरतील. यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी संचालक अंकुश माने यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.