जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’
काटेवाडी, ता. ८ : स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता.८) ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. ती ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविली जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जलजीवन मिशनअंतर्गत स्वच्छता, पाणी संवर्धन आणि राष्ट्रीय अभिमान वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या संस्कृती आणि जलशक्ती मंत्रालयांकडून ग्रामीण भागात स्वच्छ पाणी, शाश्वत स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ‘स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत’ या टॅगलाईनअंतर्गत गावागावांत विविध उपक्रम राबवले जातील. गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुजर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. १५ ऑगस्टला गावातील सार्वजनिक ठिकाणी, अमृत सरोवर आणि आरोग्य सुविधांच्या ठिकाणी ध्वजारोहण होईल. या वेळी स्वच्छता चॅम्पियन्स आणि स्वयंसेवकांचा सत्कारही होणार आहे.
मोहिमेअंतर्गत होणारे कार्यक्रम
मोहिमेच्या पहिल्या दिवशी बॅनर, पोस्टर्स आणि जनजागृती साहित्याचे वितरण केले. येत्या काही दिवसांत स्वच्छता रॅली, रांगोळी स्पर्धा, नाल्यांची साफसफाई, सांडपाणी व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा संकलन मोहीम होणार आहे. १२ ऑगस्टला जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाक्या, पंप हाउस आणि नळजोडणी यासारख्या पायाभूत सुविधांची स्वच्छता आणि सुशोभीकरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. १३ ऑगस्टला कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण याबाबत जनजागृती सत्रे आणि सार्वजनिक बैठका होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.