वऱ्हाडी मंडळींची मंचरला तारांबळ
मंचर, ता.१३ : मंचर (ता.आंबेगाव) शहर व परिसरात सोमवारी (ता.१२) रात्री व मंगळवारी (ता.१३) दुपारी जोरदार वळवाचा पाऊस झाला. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात व रस्त्यांवर पाणी साचले होते. लग्न तिथ मोठी असल्याने वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली. त्यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळित झाले होते.
मंचरच्या पूर्वेला भरवस्तीत असलेल्या वृंदावन सोसायटीत पाणी शिरले होते. तसेच पाच वर्षापूर्वी केलेला सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे रस्त्यावर पावसाळ्यात नेहमी पाण्याची डबकी साचतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना कसरत करतच ये-जा करावी लागते. डबक्यांमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुका पंचायत समिती बांधकाम विभाग यांनी सदर रस्त्याचे काम केले आहे. पण सध्या रस्त्याची मालकी मंचर नगरपंचायतीकडे आहे. नगरपंचायतीकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. पण त्यांनी दखल घेतली नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतीची राहील,’’ असे वृंदावन सोसायटीतील रहिवासी रजनी शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान लग्न समारंभासाठी दुचाकीहून ये-जा करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे फार हाल झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.