‘विघ्नहर’कडून पूर्ण एफआरपीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
मंचर, ता.१८ : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण एफआरपीची रक्कम अद्याप जमा केलेली नाही. यामुळे खात्यावर रक्कम केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दुसऱ्यांदा कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भेट घेऊन उर्वरित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.
शिरोली (ता.जुन्नर) येथे विघ्नहर कारखान्याच्या मुख्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने शेरकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना एफआरपी.ची रक्कम न मिळाल्यामुळे बांगर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, २०२२ मध्ये राज्य सरकारने काढलेला अद्यादेश उच्च न्यायालायाने रद्द केला आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार एकरकमी एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. ही याचिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दाखल केली होती. त्या निर्णयाच्या अनुषंगाने भीमाशंकर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी.ची पूर्ण रक्कम अदा केली आहे. पण विघ्नहर कारखान्याने अजूनही उर्वरित रक्कम दिलेली नाही.
कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी जून अखेरीपर्यंत उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. असा शब्द दिला आहे. मात्र, त्यानंतरही रक्कम जमा झाली नाही. तर साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करून कारखान्यावर आरआरसी कायद्याप्रमाणे अंतर्गत कारवाई करायला लावू. याबाबत राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा झाली आहे, बांगर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.