राजकारण न करण्याचे 
वळसे यांचे आवाहन

राजकारण न करण्याचे वळसे यांचे आवाहन

Published on

मंचर, ता. ३ : आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या-मानवी संघर्षाच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या विषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. हा विषय राजकारणाचा नाही, तर सामाजिक व मानवी संवेदनशीलतेचा आहे, असे त्यांनी सांगितले.
वळसे पाटील यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत अनेक हृदयद्रावक घटना घडल्या असून, अनेक शेतकरी व कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा प्रसंगी राजकारण करण्याऐवजी लोकांच्या दुःखात सहभागी व्हावे व संवेदनशीलतेने वर्तन करावे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सोशल मीडियावर या विषयावर अतिरेकी किंवा भावनांना ठेच पोहोचवणारी वक्तव्ये टाळावीत. लोकांच्या भावना दुखावतील, असे विधान करण्यापेक्षा संयम व संवेदनशीलता दाखवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com