

माळेगाव, ता. ५ : बारामती तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी आणि पवईमाळ परिसरात पाऊस व भीषण गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (ता.) बाधित शिवाराची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पणदरे परिसरातील नुकसानीची पाहणी करताना पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गणेश मुळीक, रोहन जगताप आणि कुलभूषण कोकरे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. गारपिटीमुळे केळी, आंबा, ऊस आणि पालेभाज्यांचे सुमारे ५० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागाने पीक विम्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
माळेगावचे संचालक योगेश जगताप यांनी फळबागा आणि चारा पिकांच्या नुकसानीची माहिती दिली. शेतकरी दशरथ धुमाळ यांनी माळेगाव कारखाना आणि कृषी विभागाने तातडीने सहकार्य करण्याची विनंती केली. या पाहणी दौऱ्यावेळी माळेगावच्या उपाध्यक्ष संगीता
कोकरे, संदीप बांदल, विश्वास देवकाते, किरण तावरे, योगेश जगताप, मंगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
03180
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.