शिष्यवृत्ती परीक्षेवरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
महाळुंगे पडवळ, ता. ६ : राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतली जाते. सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्व तयारी सुरू केली आहे. ही परीक्षा पाचवी व आठवीऐवजी चौथी आणि सातवीला करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
परंतु कोणत्या वर्षापासून हे धोरण राबविले जाणार आहे, हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी व अन्य शालेय संबंधित महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून शालेय शिक्षण विभागाने निर्णय घ्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी. पुढील वर्षापासून चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा करावी, अशी मागणी राज्य परीक्षा परिषद पुणे मूल्यांकन समितीचे माजी सदस्य रामभाऊ नाना सातपुते यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.