भाटघर धरणामधून १६१४ क्युसेकने विसर्ग
हिर्डोशी, ता.२९ : भाटघर धरणाच्या विद्युतगृहद्वारे सोमवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता १,६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नीरा डावा तसेच नीरा उजवा कालव्याद्वारे रब्बी हंगाम सन २०२५-२६ सिंचन सुरू आहे
वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने भाटघर धरणाच्या विद्युतगृहद्वारे विसर्ग सुरू केला असून, नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नागरिकांनी योग्यती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नीरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी१) यो. स. भंडलकर यांनी केले आहे.
नीरा प्रणालीतील सोमवारी सकाळपर्यंतचा धरणातील पाणीसाठा
भाटघर........९८.२३
नीरा देवघर........९८.००
वीर........५५.८१
गुंजवणी........९६.३९
02943
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

