नारायणगावात शेतकऱ्यांना कृषिमंत्री करणार मार्गदर्शन

नारायणगावात शेतकऱ्यांना कृषिमंत्री करणार मार्गदर्शन

Published on

नारायणगाव, ता. २: विकसित कृषी संकल्प अभियान संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या (ता. ३) सकाळी साडेआठ वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भेट देणार आहेत. यानिमित्त पदयात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.
चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात १२ जून पर्यंत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविले जात आहे. ‘अनुसंधान किसान के द्वार’ या संकल्पनेवर आधारित या महत्वाकांक्षी अभियानात खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, कृषीच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शास्त्रज्ञ, अधिकारी मार्गदर्शन करत आहेत. यानिमित्त केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजार ते कृषी विज्ञान केंद्र दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com