सूर्यप्रकाशाअभावी द्राक्ष उत्पादक अडचणी
नारायणगाव, ता. २१ : ढगाळ वातावरण व अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. द्राक्ष बागांच्या खरड छाटणीनंतर काड्या तयार होऊन सुप्त घड निर्मितीसाठी (गर्भधारणा) आवश्यक असणारा किमान ६० दिवसांचा सूर्यप्रकाश न मिळाल्याने यावर्षी घड निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक अडचणी सापडले आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात सुमारे चार हजार एकर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. तालुक्यातील द्राक्ष तोडणी हंगाम मार्च अखेर पूर्ण झाला. त्यानंतर पुढील हंगामाच्या तयारीसाठी बहुतेक शेतकऱ्यांनी एक ते १५ एप्रिल दरम्यान द्राक्ष वेलीची खरड छाटणी केली. खरड छाटणीनंतर वेलीवर नवीन काड्या तयार होतात. या काड्या परिपक्व होऊन सुप्त घडनिर्मिती होण्यासाठी खरड छाटणीनंतर ६० ते ७० दिवस सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. यावर्षी खरड छाटणीनंतर १५ ते २० दिवस सूर्यप्रकाश मिळाला. मे महिन्यात ढगाळ वातावरण होते. १२ मे नंतर तालुक्यात मागील दीड महिना सूर्यप्रकाशाचा अभाव आहे.
असा झाला मिलिमीटरमध्ये पाऊस
१. मे महिन्यात तालुक्यात १८५ ते २०० मिलिमीटर
२. जून महिन्यात मागील वीस दिवसात सुमारे दीडशे मिलिमीटर पाऊस
३. मागील २४ तासात ४० ते ५४ मिलिमीटर दरम्यान पाऊस
४. मागील दीड महिन्यात जुन्नर तालुक्यात साडेतीनशे मिलिमीटर
जम्बो द्राक्ष उत्पादकांना फटका
सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे द्राक्ष वेलींना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे काड्या तयार झाल्या नाहीत. यामुळे सुप्त घडनिर्मितीवर परिणाम होणार आहे. याचा फटका प्रामुख्याने जम्बो जातीच्या द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
सततच्या पावसामुळे द्राक्षबागेमध्ये पाणी साठले आहे. द्राक्ष बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा वाढला आहे. तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान माल छाटणी केली जाते. त्यानंतर काड्यांमध्ये तयार असलेले सुप्त घड बाहेर पडतात. यावर्षी सूर्यप्रकाश न मिळाल्याने बागेच्या काड्या तयार न झाल्याने द्राक्षाचा पुढील हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
- अनिल मेहेर, कृषिरत्न अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र
06742
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.