ऐन दिवाळीत सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा
नारायणगाव, ता. २१ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दिवाळीतील खर्चासाठी हाताशी काहीतरी पैसे असावेत, या उद्देशाने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बाजारपेठत प्रतवारी, ओलावा, खडे व मातीचे प्रमाण तपासून व्यापारी सोयाबीनची खरेदी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो या बाजारभावाने करीत आहेत. घटलेल्या उत्पादनाबरोबरच सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा पडत आहे.
नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर भागात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली जात आहे. रोख पैसे, वजनातील पारदर्शकता, वाहतूक खर्चासाठी मदत यामुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील शेतकरी नारायणगाव येथील व्यापारी सतीश कोठारी व अभय कोठारी यांच्याकडे सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत. मागील काही दिवसांपासून विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने येथील खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन घेऊन येणाऱ्या वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. येथील केंद्रात दररोज सुमारे १०० टन सोयाबीन ची खरेदी केली जाते. ओलावा पातळी दहा ते अकराच्या दरम्यान असल्यास प्रतिकिलोग्रॅम चाळीस रुपये बाजारभाव दिला जात आहे. ओलावा पातळी जास्त व खडे मातीचे प्रमाण जास्त असल्यास प्रतिकिलोग्रॅम दोन ते पाच रुपये बाजारभाव कमी दिला जात आहे. यावर्षी कांदा, बटाट्याला, बाजारभाव नाही. सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा कल सोयाबीन विक्रीकडे आहे. सोयाबीन पीक शेतात राहिल्याने शेंगा काळ्या पडल्या आहेत. शेतात ओलावा असल्याने मळणी करताना सोयाबीनमध्ये मातीचे प्रमाण व खड्यांचे प्रमाण जास्त राहत आहे. याचा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला आहे.
सोयाबीन पेरणी, मशागत, काढणी मळणी आदी सर्व कामे आम्ही घरीच केली. यामुळे मजुरीत बचत झाली आहे. चाळीस रुपये प्रतिकिलोग्राम बाजारभाव मिळाला. एकरी एक टन सोयाबीनचे उत्पन्न निघाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रतिकिलोग्रॅम तीन रुपये बाजारभाव कमी आहे. शासनाने सोयाबीनला किमान ५० रुपये प्रतिकिलोग्रॅम भाव द्यावा.
- आशुतोष बोऱ्हाडे, गोरख कडूसकर ( शेतकरी रा.वाडा, ता. खेड) :
पावसामुळे जमीन ओली असल्याने यावर्षी सोयाबीन मध्ये खडे, मातीचे प्रमाण जास्त असून सूर्यप्रकाश नसल्याने सोयाबीन बियांमध्ये ओलावा जास्त आहे. खरेदी केलेल्या सोयाबीन बियांची स्वच्छता केल्यानंतर एका टनामागे ३० ते ४० किलोग्रॅम माती, खडे निघत आहे. शेतकऱ्यांनी मळणी करताना काळजी घ्यावी, विक्रीपूर्वी सोयाबीनच्या बिया वाळवाव्यात.
- सतीश कोठारी, व्यापारी नारायणगाव
07354
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.