नसरापूरमधील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता
नसरापूर, ता.३० : नसरापूर (ता. भोर) येथील कृषी मंडलकार्यालय तीन महिन्यांपासून बंद आहे. येथे शेतकरी चकरा मारत आहेत. चौकशी केली असता कार्यालयाचे स्थालांतर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मूळ ठिकाणी जागा बदलाची कोणतीही सूचना किंवा फलक लावलेला नाही त्यामुळे हे कार्यालय बेपत्ता झाले असून, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
कृषी संबंधित मंडल कार्यालय बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जय शिवराय किसान संघटनेचे राज्याध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे व बळीराजा शेतकरी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत कदम यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून जायगुडे, कदम व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दत्तात्रेय शिंदे, ऋषिकेश खेडकर यांनी मंगळवारी (ता.२९) काही शेतकरी व प्रसारमाध्यमांसह या कार्यालयास भेट दिली. यावेळी कार्यालय बंद दिसले. त्यांना कार्यालय स्थालांतरीत झाल्याचे सांगितले. मात्र, याबाबत जुन्या कार्यालयात स्थालांतराची माहिती देणारा कोणताही फलक लावला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान, दूरध्वनी करून अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. काहीवेळातच नसरापूरचे कृषी मंडलाधिकारी सूरज पाटील व कृषी कर्मचारी राहुल दिघे यांनी तिथे आले व कार्यालय मोडकळीस आल्याने गेले तीन महिन्यांपासून महामार्गानजीकच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यालयाजवळ माहिती फलक लावला होता. मात्र, तो पडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुन्हा फलक लावून तसेच संपर्क साधून शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.