नागरी प्रश्न प्रचारातून गायब नागरिकांचे मत
रणांगण अवतीभवती
---
मुलभूत प्रश्नांकडे
दुर्लक्षामुळे खंत
निगडी ः महापालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवार व नेते प्रचार करीत आहेत. केवळ भ्रष्टाचार व परस्पर विरोधी आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावर वाक् युद्ध रंगताना दिसत असून मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक होत असल्याने नागरिक खंत व्यक्त करीत आहेत.
पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन नियोजन, सोयीसुविधा, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक रस्ते, पदपथ, स्वच्छता, दवाखाने, सार्वजनिक आरोग्य, उद्याने व त्यांची व्यवस्था, बागबगीच्या, सांस्कृतिक केंद्र, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था, महागाई, भाजी मंडई, अतर्गत रस्ते, राखीव जागांच्या विकास, पायाभूत सुविधा विषयी नियोजन, रोजगार, गुन्हेगारी, दहशत, टोळक्यांची दहशत या सारखे सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय असताना त्यांवर फारसे भाष्य कोणीही करताना दिसत नाही. दैनंदिन जीवनात सामान्यांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर कोणत्याही पक्षाकडे काहीही नियोजन दिसत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

