इंदापुरातील गांवाना सर्तकतेचा इशारा
नीरा नरसिंहपूर, ता.२३ : उजनी धरणातून भीमा नदीच्या पत्रात रविवारी (ता.२२) २१ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे शहर व परिसरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणात १०५ टीएमसी पाण्याचा साठा झाला असून धरण ७५ टक्के भरले आहे. पाठीमागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता जून महिन्यात धरणात एवढा मोठा पाणीसाठा प्रथमच झाला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंढरपूरात पुरसदृश्य परस्थिती उद्भवूनये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. तर हवामान विभागाने पावसाचा अलर्ट सांगितला आहे. त्यामुळे उजनी धरणाची १०० टक्क्याकडे वाटचाल झपाट्याने सुरू आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.