उजनीतील विसर्गामुळे सावधानतेचा इशारा
नीरा नरसिंहपूर : उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात २१ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदी पुन्हा भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर व परिसरातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उजनी धरणात ११४ टीएमसी पाण्याचा साठा झाला असून धरण ९४ टक्के भरले आहे.उजनी धरणाची शनिवारी सकाळी सहा वाजता एकूण पाणीसाठा ११४ टीएमसी झाला असून त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टीएमसी एवढा आहे. शेतकऱ्यांनी भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या आपल्या विद्युत मोटारी, केबल, पाइप अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवलेल्या आहेत. मात्र पावसाने एक महिन्यापासून पाठ फिरवल्याने पिके पाण्याला आली असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.