सविंदणे, कवठेतील कसदार माती नष्ट
कवठे येमाई, ता.२८ : सविंदणे, कवठे येमाई (ता.शिरूर) परिसरातील गावांत गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे शेतशिवारांमध्ये पाणी साचले आहे. कसदार मातीही नष्ट झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
सोमवारी (ता.२६) सायंकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, चाऱ्या दुथडी भरून वाहू लागले. अनेक शेतांमध्ये तलावासारखे पाणी साचले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ३०-४० वर्षांत मे महिन्यात अशा प्रकारचा मुसळधार पाऊस व पूर याचा अनुभव प्रथमच आला आहे. त्यातच आंबेगाव तालुक्यातील लोणी, रानमळा, वाळुंजनगर भागात अति मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्यांना पूर आला आणि शेतांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटले, भाजीपाला व हंगामी पिके वाहून गेली.
या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे, सविंदणे च्या सरपंच मनिषा नरवडे, माजी सरपंच वसंत पडवळ, उपसरपंच गोरक्ष लंघे, कवठे येमाईच्या सरपंच ज्योती मुंजाळ, उपसरपंच राजेंद्र इचके, दीपक रत्नपारखी, अविनाश पोकळे व शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच मंडल अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक यांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला जाईल. शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार शिरूर
01225
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.