फुलवडेतील शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षाच

फुलवडेतील शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षाच

Published on

फुलवडे, ता. ९ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी बाजरी, कांदा व भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांना दिले. त्यानुसार पंचनामे सुरू आहेत मात्र, फुलवडे परिसरातील भानुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मे महिन्यात फुलवडे परिसरात एकूण ३९८ मिलिमीटर पाऊस पडल्याने बाजरी, कांदा, भुईमूग आदी पिकांचे तसेच भात खाचरांचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागातील १८ गावातील शेतकऱ्यांचे २६.१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले असून महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून पंचनामे केले आहेत. या पंचनाम्यांचा अंतिम अहवाल प्रशासनाकडून शासनास पाठविणे बाकी असल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
फुलवडे येथील ११७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या २७ हेक्टर १५ आर शेतीचे पंचनामे करण्यात असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आशा मुंढे यांनी दिली.

04054

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com