डिंभे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद

डिंभे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद

Published on

फुलवडे, ता. ९ : डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पावसाने उघडीप दिल्याने बंद करण्यात आला असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग, मंचर यांच्याकडून देण्यात आली आहे.
धरणात मंगळवारी (ता. ९ सप्टेंबर)सकाळी सहा वाजता पाणीसाठा ९८.१४ टक्के म्हणजेच १२.२६२ टीएमसी इतका झाला आहे. धरणातून सकाळी सात वाजता सांडव्यावरून घोड नदीपात्रात १९०० क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला केला आहे. मात्र, वीज घरामार्फत घोड नदीपात्रात ४५० क्यूसेक व डिंभे उजवा कालवा १०० क्यूसेक असा एकूण ५५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर ९५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com