पावसामुळे वारीचा मार्ग मोकळा

पावसामुळे वारीचा मार्ग मोकळा

Published on

सोमाटणे, ता. १ : दमदार पावसामुळे भात लावण्या सुरू होण्याच्या शक्यतेने पवन मावळातील शेतकऱ्यांचा पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरवर्षी पवन मावळातील शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या आगमनाने भात लावणीला सुरुवात करतात. जूनअखेरपर्यंत भात लावण्या पूर्ण करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात, हा त्यांचा दरवर्षीचा उपक्रम ठरलेला असतो. परंतु यावर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने भात लावण्या रखडल्या होत्या. जूनच्या शेवटच्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भात लावणीचा मार्ग मोकळा झाला असून आणखी दोन दिवस चांगला पाऊस पडल्यावर भात खाचरे भरल्यानंतर लावणीला सुरुवात होईल. पंधरा जुलैपर्यंत भात लावण्या पूर्ण करून पवन मावळातील शेतकरी विठुरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. या बाबत सुरेश राक्षे म्हणाले, ‘‘दरवर्षी भात लावणीनंतर पवन मावळातील अनेक शेतकरी पंढरपूरला दर्शनासाठी जातात. यावर्षी पावसाअभावी भात लावण्या रखडल्याने पंढरीची वारी चुकण्याची भीती वाटत असतानाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने वारीचा मार्ग मोकळा झाला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.