निकोप मतदान

निकोप मतदान

सध्या मतदानाची टक्केवारी खूपच खालावली आहे. यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. आपल्या देशाचे भवितव्य आणि विकास मतदानावरच अवलंबून आहे. मतदान करणं एक पवित्र काम आहे. ते काम आपल्याला पूर्ण करायचंच आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. हे एक सुज्ञ नागरिकाचे लक्षण आहे.
- ओंकार निंबाळकर, सणसर

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना मतदानाचा एक महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. लोकशाही हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि हीच लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण सरकारकडून ज्या काही अपेक्षा करतो त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण बजावायला हवेच.
- क्षितिजा पाचर्णे, शिरूर

निकोप मतदान हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मत मौल्यवान आहे हे लक्षात घेऊन मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. ‘मी मत दिले नाही, तर काय फरक पडतो?’ असा विचार न करता आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. तसेच काही दिवसांच्या आमिषाला बळी न पडता येत्या पाच वर्षांचा विचार करायला हवा. नेता निवडताना त्याचे शिक्षण, नेतृत्व क्षमता आणि बोलण्याची पद्धत देश व आपल्या प्रदेशाप्रती असणारी आपुलकी या सर्वांगीण गोष्टींचा विचार आपण मतदारांनी करायलाच हवा.
ॲड. ओंकार जगताप, माहूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com