मंचरमधील विद्यार्थी रमले कथाकथनात

मंचरमधील विद्यार्थी रमले कथाकथनात

Published on

मंचर, ता. ११ : सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई या शालेय विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला तालुक्यातील विविध शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ एनआयई उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत केले.
या उपक्रमाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मंचर (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय व महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात व्याख्याते विवेक गुरव यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम व क्रांतिकारकांच्या कथा सांगितल्या. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास सादर केला. आईवडील व गुरुजनांचे आयुष्यातील स्थान विशद करणाऱ्या बोधकथा यावेळी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याला वाव मिळावा, या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याने संवाद साधायला शिकले पाहिजे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य नितीन बाणखेले, पर्यवेक्षक दिलीप बच्चे, दशरथ काळे, गुरुकुल विभाग प्रमुख कल्याणी बांगर, किसन गुडदे, अमोल गेंगजे, संदे, सीमा बाणखेले, सोनाली शिंदे, संदेश पिंगळे, प्रलय गावंड, प्रमोद चपटे, किसन थोरात, मारुती बोऱ्हाडे, विजय कराळे आदी उपस्थित होते. तसेच, महात्मा गांधी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय दवंडे, ज्योती बेळगे, सुरेखा लोंढे, सोमनाथ इंदोरे, बबली शर्मा, ललिता खांडगे, दीपाली तातळे, तर महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक चित्रा बांगर, सोनाली रणदिवे, मनीषा सोमवंशी, सोनल पारेख व सहकारी शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सकाळ एनआयई उपक्रमाची माहिती देण्यातआली. सकाळ एनआयईचे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

विद्यार्थी उपयुक्त उपक्रम
विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव देण्यासाठी मागील २० वर्षांपासून पुण्यासह महाराष्ट्रभर हा विद्यार्थी उपयुक्त उपक्रम राबविला जात आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षासाठी ४०० रुपये शुल्क आहे. मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला अशा विविध ठिकाणी हा उपक्रम होत आहे.

वर्षभर विविध कार्यक्रम
‘सकाळ एनआयई’च्या वतीने वर्षभरात कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वाचन, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयांवर शाळानिहाय कार्यशाळा, पालक समुपदेशन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, स्पर्धा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. याचबरोबर शैक्षणिक वर्ष दर शुक्रवारी साप्ताहिक स्वरूपातील अंक सभासदांना मिळतील. यात अनेकविध लेख, गंमतकोडी, अवांतर वाचनीय सदरांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू टिफीन बॉक्स देण्यात येणार आहे. आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात व्हावा, यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सकाळ एनआयई’च्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com