‘वीर’मधून २८ हजार क्यूसेकने विसर्ग

‘वीर’मधून २८ हजार क्यूसेकने विसर्ग

Published on

परिंचे, ता.२५ : वीर (ता.पुरंदर) धरणातून नीरा नदी पात्रात मंगळवारी (ता. २४) रात्री अकरा वाजता धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उघडले व नदी पात्रात २८ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
धरण परिसरात वाढलेले पावसाचे प्रमाण व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्गात कमी जास्त प्रमाणात वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून १२०४ क्यूसेक व डाव्या कालव्यातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे.
वीर धरणात ७३ टक्के म्हणजे ७.२७ टीएमसी पाणी साठा झाला आहे. भाटघर धरणात ३१.४३ टक्के म्हणजे ७.६४ टीएमसी पाणी साठा झाला आहे. नीरा देवघर २९.३२ टक्के म्हणजे ३.४४ टीएमसी पाणी साठा झाला आहे. गुंजवणी धरणात ५३.४० टक्के म्हणजे १.९७ टीएमसी पाणी साठा झाला आहे. नीरा नदी धरण साखळी क्षेत्रात येणाऱ्या चार धरणांमध्ये गेल्या चोवीस तासात ३.३० टीएमसी पाण्याची आवक झाली असून, चारही धरणात मिळून ४१ टक्के म्हणजे २०.१४ टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी १०.५१ टक्के म्हणजे पाच टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची नोंद आहे.
नीरा देवघर व भाटघर अद्याप नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला नसून गुंजवणी मधून २५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. कानंदी, शिवगंगा, पूर्ण गंगा तसेच पाणलोट क्षेत्रातील ओढ्या नाल्यांमधून वीर धरणात १५ हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. पुणे, सातारा, सोलापूर येथील जिल्हाधिकारी व नदी काठच्या ‌ तालुक्यातील तहसीलदार, पोलिस यंत्रणा व ग्रामपंचायत यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


02668

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com