भाजीपाल्यांच्या दरात घसरण

भाजीपाल्यांच्या दरात घसरण

Published on

राजेगाव, ता. २४ : आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने बाजारपेठेत भाज्यांचे दर घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक अडचणींचा सामना करत असलेला शेतकरी मात्र संकटात सापडल्याचे दिसून येत आहे ‌
मे महिन्यातच समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर तरकारीची लागवड करण्यात आली. साहजिकच भाज्यांची आवक वाढली आहे, ज्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पुरवठा वाढला आहे. दुसरीकडे, आषाढ महिन्यात मांसाहाराची रेलचेल असते. भाज्यांची मागणी घटल्यानेही दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राजेगाव (ता. दौंड) आठवडे बाजारात भाजीपाल्यांचे दर किलोप्रमाणे-
हिरवा वाटाणा - ८०-१००, गवार - ५०- ६०, भेंडी - ३०-४०, हिरवी मिरची - ६०-६०, शिमला मिरची - ४०-५०, फ्लॉवर - ३०-४०, कोबी - १५-२०, कारले - ४०-५०, टोमॅटो - २०-३०, वांगी - ३०-४०, दोडका - ४०-५०, बटाटा - २०-३०, कांदे - १५-२०, लसूण - ८०-१००, लिंबू - २०-३०, आले - ४०-५०, कोथिंबीर - ५-१०, मेथी - ५-१०, शेपू - १०-१५, पालक १०-१५.

भाजीपाल्यांचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांबरोबर भाजी विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत. आम्ही बारामती बाजारामधून तरकारी खरेदी करतो. अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने वाहतूक खर्चही मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी शेतमाल कमी किमतीत विक्री करतो.
- राजेंद्र कदम, भाजी विक्रेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com