कणखर नेतृत्व आणि जनसेवेच्या बांधिलकीचा संगम म्हणजे दादा

कणखर नेतृत्व आणि जनसेवेच्या बांधिलकीचा संगम म्हणजे दादा

Published on

राजकारणात प्रामाणिकपणा, कणखर नेतृत्व आणि जनसेवेची बांधिलकी यांचा संगम म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात चार दशके कार्यरत असलेले अजितदादा हे फक्त एक कुशल प्रशासकच नाहीत, तर सामान्य जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- संग्रामसिंह नानासाहेब मोकाशी
मा. उपसरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत कटफळ.
अध्यक्ष शारदामाई नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, बारामती.
अध्यक्ष सद्गुरु श्री वामनराव पै शिक्षण संस्था कटफळ तालुका बारामती, पुणे

अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. आमदार, वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली कार्यकुशलता सिद्ध केली. राज्याच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. सिंचन, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांनी सुरू केलेल्या योजना आजही लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवतात.त्यांचा कार्यशैलीचा ठसा म्हणजे ‘विकास हेच अंतिम लक्ष्य’ ते निर्णयक्षम, स्पष्टवक्ते आणि वेळेचे अत्यंत काटेकोर पालन करणारे नेता म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील समस्या असोत वा शहरी प्रश्न – दादांनी नेहमीच तत्परतेने उत्तर दिले आहे.
दादांनी नेहमीच काम करत असताना कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या जातीचा पातीचा पंथाचा धर्माचा हा कधीही विचार केला नाही. येणारा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याची गरज त्याचा असलेलं काम हे कशा पद्धतीने पूर्ण होईल याचाच नेहमी विचार केला. दिलेल्या प्रत्येक निवेदनाचा निपटारा करणे ही दादांची उभ्या हिंदुस्थानामध्ये ख्याती आहे. त्या माणसांना दिलेले निवेदन हे फक्त कागद नसून त्या माणसाचा आयुष्य बदलावणारी निर्णायक गोष्ट असू शकते हाच विचार नेहमी दादा करत असतील. होत असेल तर तोंडावर हो म्हणून सांगणारे आणि होणारच नसेल तर समोरच्याला राग आला तरी चालेल पण हे काम माझ्याकडून होणार नाही हे तितक्याच भाषेत ठणकावून सांगणारे दादा सर्वसामान्य माणसाला नेहमी हवेहवेसे वाटतात.

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माणसांना उच्च पदावर पोहोचवण्याची क्षमता आणि धमक असणारे दादा विकास कामाबाबतीत देखील तेवढीच क्षमता आणि तेवढीच धमक ठेवतात. गेल्या ५०-६० वर्षांतील बारामती आणि कोरोनाच्या काळानंतर बदललेली बारामती यामधील जर फरक पाहिला तर दादा काय आहेत आणि दादा काय करू शकतात निश्चितपणे ही गोष्ट सर्वसामान्य माणसांच्या घरामध्ये घर करून राहते.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी असते आणि वित्तमंत्री म्हणून काम करत असताना राज्याची अकाउंटटिबिलिटी पाहणारे दादा तेवढेच कार्यक्षम म्हणून देखील उभा भारत देश पाहतो.

उद्याचा महाराष्ट्र हा दादांच्या रूपामध्ये कर्तबगार कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून तर पाहतोय परंतु ज्यावेळी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचा विकास एका वेगळ्या उंचीवर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. जे जे जगामध्ये आहे, ते ते माझ्या बारामती मध्ये पाहिजे अशी इच्छा असलेले दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचे नेतृत्व असेच ठाम आणि प्रभावी राहो, हीच अपेक्षा!

08618

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com