सोमेश्वरनगर येथील महाविद्यालयात ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’
सोमेश्वरनगर, ता. २६ : ‘‘स्वातंत्र्यावेळी झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीमध्ये सुमारे दीड कोटी लोक स्थलांतरित झाले. लाखो निरापराध नागरिकांचे बळी गेले. धर्माच्या आधारावर झालेल्या या फाळणीने पाकिस्तान चुकीच्या दिशेला गेला. मात्र, विविधतेत एकता जपणारा आणि सहिष्णुतेचे दर्शन घडविणारा भारत देश यातून लवकरच सावरू शकला. विविधतेत एकता हे आपले वैशिष्ट्य आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पोपट शिंदे यांनी केले.
येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे डॉ. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.
याप्रसंगी डॉ. शिंदे यांनी १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. तसेच १९३० मध्ये बॅरिस्टर जिना यांनी मांडलेला द्वि-राष्ट्रवादाचा सिद्धांत, इंग्रजांचे फोडा आणि राज्य करा हे धोरण आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फाळणीला दिलेली संमती या सगळ्या घटनांचा त्यांनी चिकित्सक आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. जवाहर चौधरी, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. गेनू दरेकर, डॉ. प्रवीण ताटे, डॉ. संजू जाधव, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. नीलेश आढाव, डॉ. राहुल खरात आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जया कदम यांनी केले तर डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.