शैक्षणिक समस्यांवर शिक्षणमंत्र्यांचा सकारात्मक निर्णय
सासवड, ता. ६ : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ४) मंत्रालयात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीला शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर यांनी दिली.
चर्चेअंती, ‘‘१५ जून २०२४ च्या संच मान्यता आदेशातील अटींमध्ये शिथिलता आणली जाईल. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांसाठी ‘शून्य शिक्षक’ असलेल्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही, संच मान्यता सुधारित होईपर्यंत कोणालाही अतिरिक्त ठरवले जाणार नाही आणि पगार थांबवला जाणार नाही. १५ मार्चच्या संच मान्यता शासन निर्णयात बदल करून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांसाठी शिक्षक देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल,’’ असे आश्वासन भुसे यांनी दिले.
याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अमरिश पटेल, निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर, जयंत अजगावकर, सुधाकर अडबले, माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि कपिल पाटील, राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार, राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन, समीर सावंत, मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर, संदेश राऊत, वामन तर्फे, गुरुदास कुसगावकर, त्रिगुणाताई सुदर्शन, नितीन चौधरी, तानाजी माने, कुंडलिक मेमाणे, तुकाराम मुळीक, दत्तात्रेय रोकडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.