चिखलणीच्या कामामध्ये पुरंदरमधील शेतकरी व्यग्र
सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा पावसाने लवकर आणि दमदार हजेरी लावल्यामुळे भात लागवडीच्या कामाला वेग आला आहे. पुरंदर किल्ला परिसरात भात उत्पादक शेतकरी सध्या चिखलणीच्या कामात व्यग्र असून, भात रोपे उपटून लागण करण्याची लगबग सुरू झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात खाचरांतून पाणी वाहत आहे. लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. शेतकरी मोठ्या उत्साहात पूर्वमशागतीची कामे पूर्ण करत आहेत. नांगरणीनंतर शेतात पाणी भरून चिखलणी (चिखल करणे) केली जात आहे, ज्यामुळे भात रोपांना योग्य वातावरण मिळते. अनेक ठिकाणी भात रोपे उपटून लागणीसाठी तयार केली जात आहेत. यावर्षी चांगल्या पावसाने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एकीकडे भात लागणीची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे पावसाची संततधार पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील अन्य पिकांसाठी अडचणीची ठरत आहे. एकीकडे भातशेतीसाठी अनुकूल स्थिती असली तरी, नगदी पिकांचे नुकसान झाले आहे.
05237
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.