निमगावात शेतकऱ्यांना खरिपाविषयी मार्गदर्शन

निमगावात शेतकऱ्यांना खरिपाविषयी मार्गदर्शन

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.१४: निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासंदर्भात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात आले.
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतजमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत असल्याने उत्पादन खर्च वाढत असून उत्पादन घटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय खतांचा होत असलेला कमी वापर. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. यासाठी माती परीक्षण करून एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
यावेळी मंडल कृषी अधिकारी धनश्री चासकर, विभागीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष मरभल, रणजित निंबाळकर, प्रांजली गेडाम, स्वाती साहा, पशुसंवर्धन विषयतज्ज्ञ धनेश पडवळ, सरपंच सचिन चव्हाण आणि शेतकरी उपस्थित होते.

‘संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या महत्वाकांक्षी अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामातील नियोजन, पिकांची सुधारित लागवड व तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सोयाबीन व मूग बीज प्रक्रिया, कृषी विभागाच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, कान्हूर मेसाई, पाबळ, राऊतवाडी, शिक्रापूर, निमगाव भोगी, खैरेनगर आदी गावामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, कांदा लसूण संशोधन केंद्र, पुष्प संशोधन केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

07594

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com