भाषणांमुळे टळतेय लग्न घटिका

भाषणांमुळे टळतेय लग्न घटिका

Published on

टाकळी हाजी, ता. १४ : सध्या लग्नसराईचे पर्व सुरू आहे. विवाहावेळी नातोवाईकांबरोबरच नेत्यांची लगबग असते. अशावेळी त्यांचे सत्कार, शुभेच्छापर भाषणांमुळे लग्नाचा मुहूर्त टळला जात असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
लग्नासाठी हजेरी लावणारे राजकीय नेते कार्यकर्त्यांसह सोहळ्यात दाखल झालेले असतात. व्यासपीठावर त्यांचे स्वगत करण्यात येते. मग त्यांची भाषणे सुरु होतात. असे एक नव्हे अनेक जण बोलण्यासाठी इच्छुक असतात. त्यातच सगळे लग्नाचे विधी खोळंबून जातात. व्यसपीठावरील हा गोंधळ आवरण्यासाठी मुला-मुलीकडच्यांची दमछाक होत असते. त्यातच उकाड्याने हैराण केलेले असते. या प्रकारात विवाहाचा ठरलेला मुहूर्त गाठणे अशक्यच असते. त्यामुळे येणारा वऱ्हाडी कंटाळून जात असल्याचे चित्र सध्या विवाहामध्ये पहावयास मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com