नियंत्रण सुटल्याने 
चारचाकी नदीत

नियंत्रण सुटल्याने चारचाकी नदीत

Published on

उद्धट, ता. १२ : तावशी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीच्या पुलावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन थेट नदीमध्ये कोसळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचे नुकसान झाले.
शनिवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता वाहनचालक राजेंद्र गुरव (रा. पवारवाडी) हे आपल्या चारचाकीने प्रवास करीत असताना तावशी येथे बंधाऱ्यावरील पुलावर आले असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट नदीत कोसळली. पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा नीरा नदीवरील हा पूल सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे, तसेच हा पूल पुणे जिल्हा व इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या भागांमध्ये आहे. मात्र दोन्हीकडील प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नसल्याने मागील काही दिवसांमध्ये या प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये दोन जण मृत्युमुखीदेखील पडले आहेत. ही जागा फक्त दुचाकी वाहनांसाठी आहे, मात्र यावरून सर्रासपणे ट्रॅक्टर, ट्रेलर अशी चारचाकी वाहनांची वाहतूक होते.

दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल फक्त पायी चालणाऱ्या सायकल व दुचाकीस्वारांसाठी आहे, परंतु यावरून चारचाकी वाहनांचीही वाहतूक होते. मागे अपघात झाला तेव्हा प्रशासनाला हा पूल बंद करण्यासाठी कळविले होते, मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.
- चंद्रकांत सपकाळ, सरपंच, तावशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com