उरुळीत मिळणार ‘बाल संस्कारा’चे बाळकडू

उरुळीत मिळणार ‘बाल संस्कारा’चे बाळकडू

उरुळी कांचन, ता. ३ : सुसंस्कारित आणि आदर्श पिढी व मानवी जीवनाचे भवितव्य घडविणे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्रीकृष्ण सेवा मंडळ आयोजित ‘श्री राऊळ बालसंस्कार शिबिर महंत गिरीशराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून रविवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. १०) या दरम्यान आयोजित केले आहे.

या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, श्रीमदभगवदगीता पठण, स्तोत्र पठण, धर्म संस्कार मुलांचे भावविश्व, वक्तृत्व, मुक्तांगण ज्ञानयोग साधना, ईश्वर कार्याची ओळख, महानुभाव तत्वज्ञान, नैतिक मूल्य, आचार-विचार प्रणाली, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी उपक्रम संपन्न होणार आहेत.

याबाबत माहिती देताना महंत गिरीशराज शास्त्री म्हणाले, की बाल संस्कार ही आजच्या काळाची गरज. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी व आदर्श बनते. महानुभावांची संस्कृती, इतिहास, विविध स्तोत्रे, आरती, महानुभाव तत्वज्ञान, नितिपर कथा, उत्तम चरित्र व योग्य आचरण यांचे बाळकडू देण्यासाठी बालमन हा एक आदर्श काळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com