इंदापुरात मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला

इंदापुरात मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला

वडापुरी, ता. १० : गेल्या तीन चार दिवसापासून इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षी पाऊसच झाला नसल्याने तालुक्यातील विहिरीची पातळी खालावली होती व बोअर सुद्धा उघडे पडले होते. त्यामुळे खरीप हंगाम व रब्बी हंगामातील मका, ज्वारी बाजरी, भुईमूग इत्यादी पिकांना तर फळबागांसह उसाला उन्हाळ्यात पाणी मिळाले नसल्याने पिके जळून गेली होते.

तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही का प्रमाणात हिरवीगार असलेली व जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. वडापुरी परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
दरम्यान, रामवाडी येथील शेतकरी सोमनाथ पडळकर यांच्या शेतातील विहिरीवर बांधलेली दगडी बांधकाम कठडा- रिंग (जई) जादा पाण्यामुळे विहिरीत पडला असल्याने मोठे नुकसान झाले आहे तर वडापुरी येथील शंकर बागल उसाच्या पिकात पाणीच पाणी झाले आहे. मका, उन्हाळी भुईमूग, चारा पिके व फळबागांना फायदा झाल्याचे उत्पादक शेतकरी यांनी सांगितले.

02123

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com