चतुःसूत्री पद्धतीने भात लागवड करा : करंजे

चतुःसूत्री पद्धतीने भात लागवड करा : करंजे

Published on

वेल्हे, ता. ३ : ‘‘राजगड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे प्रमुख पीक भात असून उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी चतुःसूत्री पद्धतीने भात लागवड करावी,’’ असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषयी तज्ज्ञ संतोष करंजे यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा व पंचायत समिती वेल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह वेल्हा येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन, कृषी संजीवनी पंधरवडा सांगता समारंभ व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता.१) केले होते.
यावेळी मंडल कृषी अधिकारी श्रीधर चिंचकर यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनपट विषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली तर मंडळ कृषी अधिकारी प्रशांत भोसले यांनी एमआरजीएस अंतर्गत बांबू व फळबाग लागवड विषयी माहिती दिली.
दरम्यान प्रगतशील बांबू उत्पादक शेतकरी व शिवतोरण शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष गणपत गुजर यांनी बांबू लागवड विषयी मार्गदर्शन केले .
दरम्यान, कृषी दिनानिमित्त तालुक्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी दत्तात्रेय दिघे, सीताराम दसवडकर, लक्ष्मण दारवटकर, दामू शेजवळ, गणपत गुजर, चंद्रकांत काटकर यांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी पंचायत समिती वेल्हेचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, कृषी अधिकारी उत्तम साखरे, कृषी पर्यवेक्षक तानाजी गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, बाळासाहेब गर्जे, नितीन धुमाळ, नीलेश अबदागिरे सर्व कृषी सहाय्यक तसेच वेल्हा व पानशेत भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तम साखरे यांनी सूत्रसंचालन केले.

02498

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.