गुंजवणी धरणात ८८ टक्के साठा

गुंजवणी धरणात ८८ टक्के साठा

Published on

वेल्हे, ता. १९ : गुंजवणी धरण (ता. राजगड) परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये धरण पातळीमध्ये वाढ झाली असून, मंगळवार (ता.१९) धरणात ८८.४८ टक्के साठा पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती गुंजवणी धरण विभागाचे उपअभियंता नयन गिरमे यांनी दिली.
राजगड तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून धरण क्षेत्र व रायगड जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या निव्ही, कानंद, घेवंडे, घिसर, अंत्रोली या परिसरामधील ओढ, नाले, दुथडी भरून वाहत आहेत, तर डोंगर माथ्यावरील लहान- मोठ्या धबधब्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत असल्याने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com