राजगडमध्ये भाताच्या नुकसानीची शक्यता

राजगडमध्ये भाताच्या नुकसानीची शक्यता

Published on

वेल्हे, ता.१५ : राजगड तालुक्यात बुधवारी (ता.१५) सायंकाळी परतीच्या मुसळधार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडविली. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले तर भात पिकाचेही सुद्धा मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. तर सकाळी ढगाळ वातावरण झाले तर दुपारी उन्हाचा चांगला चटका नागरिकांना लागत होता. याचे पर्यावसान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजगड तालुक्याच्या पूर्व भागास वादळी वाऱ्यासह पावसाने चांगले झोडपून काढले. पूर्व भागातील असलेल्या आंबवणे, करंजावणे, अडवली, अस्कवडी, मार्गासनी, खांबवडी, विंझर, लाशिरगाव, मालवली, दापोडे,पाबे, वेल्हे बुद्रुक या या गावांच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अठरा गाव मावळ परिसरामध्ये कमी अधिक पाऊस पडला.
करंजवणे येथील प्रगतशील शेतकरी अनंत शिंदे म्हणाले की, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले सोयाबीन भिजले आहे सध्या भात पीक हे फुलोऱ्यात असताना भात पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.''
अठरा गाव मावळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भावळेकर म्हणाले, ''या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरी जोरदार वाऱ्यांमुळे वाड्या वस्तीवरील घरांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com