राजगडला सहा दिवसांत
आठ पशुधनांचा मृत्यू

राजगडला सहा दिवसांत आठ पशुधनांचा मृत्यू

Published on

वेल्हे, ता. १० : राजगड तालुक्यातील विविध ठिकाणांवर गेल्या सहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात आठपेक्षा अधिक पशुधनांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. त्यामुळे ऐन भात कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
किल्ले तोरणा व राजगड परिसरासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यालगत गुंजवणी व पानशेत धरण परिसरामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. घाटमाथ्यावरील चांदर या गावातील सविता रामभाऊ ढेबे यांच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला, तर
निवी येथील सदाशिव सोमाजी गोऱ्हे यांचे एक वासरू व रमेश सोमाजी गोऱ्हे यांची एक बकरे, तर अंत्रोली येथील अरुण शिवराम राऊत यांच्या वासराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
याबाबत राजगड तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे म्हणाले, ‘‘सद्यस्थितीला राजगड तालुक्यात अनेक ठिकाणी विविध भागात बिबट्यांचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. छोटी पशुधन असलेल्या जनावरांना रानात मोकळे सोडू नये. नागरिकांनी शेत परिसरात वावरताना काळजी घ्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com